"या चित्रातल्या वेलीवर नाना रंगांची फुलं उमलली आहेत.प्रीतीही या वेलीसारखीच आहे.प्रीती म्हणजे यौवनाच्या प्रेरणेतून उद्भवणारी वासना नव्हे!त्या वासनेची किंमत मी कमी मानत नाही.सा-या संसाराचा आधार आहे ती!पण या वासनेला जेव्हा खोल भावनेची जोड मिळते,तेव्हाच प्रीती ही अमृतवेल होते.मग या वेलीवर करुणा उमलते,मैत्री फुलते.मनुष्य जेव्हा जेव्हा आत्मप्रेमाचे कवच फोडून बाहेरच्या विश्वाशी एकरुप होतो,तेव्हा तेव्हा प्रीतीचा खरा अर्थ त्याला जाणवतो.या बाहेरच्या विश्वात रौद्र-रम्य निसर्ग आहे.सुष्ट दुष्ट माणसं आहेत,साहित्यापासून संगीतापर्यंच्या कला आहेत आणि महारोग्याच्या सेवेपासून विद्न्यातल्या संशोधनापर्यंची आत्म्याची तीर्थक्षेत्रे आहेत."
"पण हीच प्रीती नुसती आत्मकेंद्रित झाली,आत्मपूजेशिवाय तिला दूसरं काही सुचेनासं झालं,म्हणजे मनुष्य केवळ इतरांचा शत्रू होत नाही ,तो स्वत:चाही वैरी बनतो!मग या वेलीवर विषारी फुलांचे झुबके लटकू लागतात."
लेखक - वि. स. खांडेकर( अमृतवेल )
Wednesday, October 17, 2007
Subscribe to:
Post Comments (Atom)
1 comment:
nice one
Post a Comment